देशभरात इंधनाचे दर (fuel rate) वाढत असताना ते दर कमी करण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी थेट बिगर भाजपशासित राज्यांनाच सुनावले आहे. महाराष्ट्रासह (maharashtra), केरळ, आसाम, तेलंगणा आणि पश्चिम बंगालने पेट्रोल आणि डिझेवरील दर कमी करावा. सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुनावले आहे. राज्यांनी किती कमवले यात जात नाही. पण देशाच्या हितासाठी इंधनाचे दर मागेच कमी करायला हवे होते. ते आता करा आणि नागरिकांना फायदा करून द्या, असं मोदींनी म्हटलं आहे. यामुळे इंधन दरवाढीवरुन केंद्र सरकारनें थेट बिगर भाजपशासित राज्यांना सुनावल्याचं दिसून आलंय. यावरुन केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकारे द्वंद पुन्हा एकदा समोर आलंय .