प्रकाश आंबेडकर कुणाचा सल्ला मानणार? म्हणाले, उद्धव ठाकरे आणि कुणा एकाचे नेतृत्व

| Updated on: Jan 27, 2023 | 1:29 PM

आपण जिंकत नाही असे भाजपला वाटते तेव्हा भांडणे लावा ही त्यांची पॉलिसी ठरलेली आहे. आपला शत्रू कोण आहे हे ओळखले पाहिजे. 

Follow us on

मुंबई : देशातील लोकशाही वाचवायची असेल आणि हुकूमशाही येण्यापासून थांबवायचे असेल तर सर्वानी एकत्र आले पाहिजे. आपण जिंकत नाही असे भाजपला वाटते तेव्हा भांडणे लावा ही त्यांची पॉलिसी ठरलेली आहे. आपला शत्रू कोण आहे हे ओळखले पाहिजे.

संजय राऊत यांनी आघाडीतील जे प्रमुख स्तंभ आहेत. नेते आहेत त्यांच्याविषयी सगळयांनी एकमेकांचा आदर ठेवून बोलले पाहिजे, असा सल्ला दिला आहे. त्यावर बोलताना हा सल्ला उद्धव ठाकरे यांनी दिला असता तर मी मान्य केला असता. कोण कुणाचे नेतृत्व मान्य करत नाही. कारण प्रत्येकाचा स्वतंत्र पक्ष आहे असे वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.