रत्नागिरीत भुस्खलन झालं आहे. कोकणात सतत पाऊस सुरू आहे. पावसात कोकण उद्ध्वस्त होत असतो. त्यामुळे कोकणाच्या संरक्षणासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. ज्या गावांमध्ये दरडी कोसळण्याची शक्यता असते त्याचं सर्वेक्षण करण्याची गरज आहे. वेळीच सावध होण्याची गरज आहे, असं प्रवीण दरेकर म्हणाले. प्रवीण दरेकर यांनी टीव्ही9 मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.