देशात भाजपाची मनमानी चालली असून राजकीय नेत्यांविषयी मोठे षडयंत्र रचलं जात असून त्यासाठी कारवाया केल्या जात आहेत अशी टीका शिवसेनेच्या खासदार प्रियंका चुतुर्वेदी यांनी केली आहे. याविषयी सभागृहात चर्चा होणं गरजेचं आहे यासाठी आम्ही राज्यसभा अध्यक्षांना पत्र लिहीलं असल्याचेही त्यांनी सांगितले. खासदार संजय राऊत यांच्यावर कारवाई झाली असली तरी संजय राऊत गुडघे टेकणाऱ्यातले नाहीत आम्ही शिवसैनिक असून कायम लढत राहू असंही त्यांनी सांगितले. जे ईडीच्या भीतीनं भाजपकडे गेलेत तेच या कारवाईमध्ये सामील असू शकतात असा संशयही त्यांनी यावेळी व्यक्त केला. ही ईडी नाही तर एक्सटेंडेड डिपार्टमेंट ऑफ भाजपा असं बनली आहे. भाजपानं दिलेली स्क्रीप्ट ईडी वाचत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.