काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या सुरु आहे. या यात्रेसोबतच काँग्रेसकडून एका नव्या अभियानाची घोषणा करण्यात आली आहे. ‘हात से हात जोडो’ अभियानाची घोषणा काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. पुण्यातून या अभियानाची सुरुवात झाली आहे. यात मोदी सरकारच्या कामाची चुकीची पद्धत लोकांपर्यंत पोहोचवला जाणार असल्याचं काँग्रेसच्या वतीने सांगण्यात येतंय. केंद्र आणि राज्य सरकारची असफल धोरणं लोकांपर्यंत पोहोवून सत्य समोर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आलं आहे.