जालना जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पाऊस पडल्याने आता पेरणीपूर्व मशागतींच्या कामाला वेग येणार आहे. तर काही ठिकणी पेरणीला देखील सुरुवात करण्यात आली आहे. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्यामुळे नागरिकांना उष्णतेपासून देखील दिलासा मिळाला आहे.