सुरेंद्र आकोडे,Tv9 मराठी, प्रतिनिधी, अमरावती : औरंगाबादचं पालकमंत्रीपद संदिपान भुमरे (Sandeepan Bhumare) यांच्याकडे देण्यात आलं आहे. त्यानंतर त्यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. अनेक वर्षांनंतर औरंगाबादला स्थानिक पालकमंत्री (Aurangabad Guardian Minister) मिळालं त्याचा आनंद आहे, असं भुमरे म्हणालेत. येत्या काळात औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक समस्या मार्गी लावण्याचा मानस आहे, असं म्हणत मत्री संदिपान भुमरे यांनी आपलील पुढची दिशा स्पष्ट केली आहे.