विवेक गावंडे, Tv9 मराठी, प्रतिनिधी, यवतमाळ : यवतमाळ आणि वाशिम या दोन जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद (Guardian Minister) संजय राठोड यांच्याकडे देण्यात आलं आहे. त्यानंतर राठोड यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. माझ्याकडे दोन जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. या दोन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित आहे. ते सोडविण्यासाठी मी प्राध्यान्य देणार आहे, असं राठोड (Sanjay Rathod) म्हणालेत.