AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एका जिल्ह्यामुळे मला नाकीनऊ येत होतं, आता फडणवीस सहा जिल्ह्यात कसं काय काम करणार?; अजितदादांचा सवाल

मलाही संताप येतो. मीही बोलायला कडक आहे. मी अडीच वर्षे उपमुख्यमंत्री होतो. पण कुणाला कसं बोलायचं हे समजतं. सकाळी सहापासून कामे करतो.

एका जिल्ह्यामुळे मला नाकीनऊ येत होतं, आता फडणवीस सहा जिल्ह्यात कसं काय काम करणार?; अजितदादांचा सवाल
मी कधीही कोणत्याही संस्थेची गाडी वापरली नाही, पण काहीजण...; अजितदादा नेमकं काय म्हणाले? Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 25, 2022 | 2:17 PM
Share

नाविद पठाण, टीव्ही9 प्रतिनिधी, बारामती: शिंदे सरकार… (shinde government) तुम्हाला संधी मिळालीय. कशी मिळालीय…गद्दारी केली की नाही मला माहीत नाही. पण तुम्ही जनतेची कामे करा ना आता. पालकमंत्री नेमलेत. कुणाला एक जिल्हा, कुणाला दोन जिल्हे दिले. पण फडणवीसांना (devendra fadnavis) 6 जिल्हे दिलेत. एक जिल्हा माझ्याकडे होता तेव्हा मला नाकीनऊ येत होतं. आता सहा जिल्हे म्हटल्यावर काय होणार काय माहीत. आता त्यांनी जनतेची कामे करावीत. पण तरीही देवेंद्र फडणवीस यांना माझ्या शुभेच्छा आहेत, असा खोचक टोला राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (ajit pawar) यांनी लगावला.

बारामतीत तालुका सहकारी खरेदी- विक्री संघाची 59 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज पार पडली. या सभेला विरोधी पक्षनेते अजित पवारांनी हजेरी लावली. यावेळी अजित पवारांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. त्यावेळी त्यांनी फडणवीस यांना टोला लगावला. खरेदी विक्री संघात काजीजण गैरव्यवहार करतात. काहींना संचालकांचा हात आहे म्हणून क्लिन चिट दिली जाते. वेगवेगळ्या तक्रारी आहेत. असं चालत असेल तर मला कारवाई करावी लागेल, असा इशारा अजित पवार यांनी दिला.

कोणत्याही संस्थेचा अध्यक्ष व कार्यकारी संचालकांनी पारदर्शक माहिती दिलीच पाहिजे. आपली मुलंही ऐकत नाहीत. कामगारांनाही बोलून चालत नाही. पण काही संस्थांचे संचालक बैठकीला आल्यानतर कामगारांशी चुकीचं वागतात. चांगली व्यक्ती कशी ओळखावी. एखादा ड्रायव्हर 25/30 वर्षे टिकला असेल तर तो माणूस चांगला आहे. त्या व्यक्तीची वागणूक चांगली आहे म्हणून तो ड्रायव्हर टिकला, असं ते म्हणाले.

काहींच्या बाबतीत तक्रारी येतात. अधिकारी नीट बोलत नाहीत. अधिकारी, खातेप्रमुख ही महत्वाची लोकं आहेत. मलाही संताप येतो. मीही बोलायला कडक आहे. मी अडीच वर्षे उपमुख्यमंत्री होतो. पण कुणाला कसं बोलायचं हे समजतं. सकाळी सहापासून कामे करतो. अधिकारीही येतात. जिव्हाळा आहे म्हणून अधिकारी येतात. सारखंच आपण चुकीच वागलो तर अधिकारी कसे टिकतील? अधिकारी, खातेप्रमुख यांच्याशी नीट वागा, असा सल्लाही त्यांनी दिला.

काहीजण संस्थांच्या जीवावर राजकारण करतात.. आर्थिक भार त्या संस्थांवर टाकतात. मीही कधी कोणत्या संस्थेची गाडी वापरली नाही. महाराष्ट्रात कोणत्या खरेदी विक्री संघाने चांगले काम केले असेल तर त्यांचे अनुकरण करा, असं आवाहन त्यांनी केलं.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.