शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपच्या नेत्यांबरोबरच आता चंद्रकांत पाटील यांच्यावरही जोरदार हल्लाबोल करत आता चंद्रकांत पाटलांची पुणेकरही चंपी करणार असल्याचे सांगत त्यांच्यावर टीका केली आहे. चंपाकली आता कोमेजून गेली असून त्यांना आता कोल्हापूरातही जागा नाही असं सांगत कोल्हापूरही त्यांच्यासाठी राहिलं नाही अशी टीका त्यांच्यावर करण्यात आली आहे. संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटलांवर टीका करण्यात आल्यानंतर जोरदार हशा पिकत त्यांनी चंपा की बात छोड दो असं राऊत यांनी सांगितले.