मुंबई: अभिनेत्री कंगना रणावतने महात्मा गांधीबाबत पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी कंगनावर निशाणा साधला आहे. वेडे लोकं बरळत असतात. ते का बरळतात? ते कोणत्या नशेत बरळतात याचा तपास एनसीबीने करावा, असा चिमटा संजय राऊत यांनी कंनाला काढला आहे. संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधतान हा टोला लगावला. वेडे लोकं बरळत असतात. ते का बरळतात? ते कोणत्या नशेत असतात? त्यांना या नशेचा पुरवठा कोण करतं? एनसीबीने त्याचा तपास करावा ही मागणी आहे, असा टोला राऊत यांनी लगावला.