दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी… संजय राऊतांच्या मोठ्या दाव्याने खळबळ

दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी… संजय राऊतांच्या मोठ्या दाव्याने खळबळ

| Updated on: Sep 19, 2026 | 11:44 AM

दिशा सालियन प्रकरणी खासदार संजय राऊत यांनी नितेश राणे यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. ठाकरे कुटुंबाची बदनामी करण्याच्या हेतूने हे प्रकरण पुन्हा उकरून काढले जात असल्याचा आरोप राऊत यांनी केला. ते म्हणाले की, जर संयमाचा बांध तुटला तर ते अधिक स्पष्टपणे बोलतील, कारण हे प्रकरण २०१२ साली अपघात म्हणून बंद झाले होते.

खासदार संजय राऊत यांनी दिशा सालियन प्रकरणावरून भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर पलटवार करत ठाकरे कुटुंबाच्या प्रतिष्ठेचा मुद्दा उपस्थित केला आहे. राऊत म्हणाले की, “तुम्ही ज्या पद्धतीने कोणाच्या तरी हातचं बाहुलं बनून आमच्यावरती चिखलफेक करताय, ठाकरे कुटुंबावर आमच्या प्रतिष्ठेचा, आमच्या अब्रूचा काही सवाल आहे की नाही?” राऊत यांनी आरोप केला की, काही “बेवडे आणि उरबडवे” एकत्र येऊन या प्रकरणाला नियंत्रित करत आहेत. त्यांच्या मते, जेव्हा महाराष्ट्रात ठाकरे कुटुंब चांगले काम करण्याचा प्रयत्न करते, तेव्हा अशी जुनी प्रकरणे उकरून काढली जातात.

ते म्हणाले की, दिशा सालियन प्रकरण सहा वर्षांपूर्वीचे असून, २०२० सालचे आहे. हे प्रकरण अपघात म्हणून तेव्हाच मिटले होते. संजय राऊत यांनी पुढे म्हटले, “मी अजूनही या विषयावर स्पष्टपणे बोललो नाही, पण जर संयमाचा बांध तुटला तर मी बोलीन.” त्यांनी असा इशारा दिला की, ठाकरे कुटुंबाला लक्ष्य करण्यासाठी ही एक पूर्वनियोजित यंत्रणा काम करत आहे.

Published on: Sep 19, 2026 11:44 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us