नवी दिल्ली : शिवसेना ठाकरेगटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर टीका केली आहे. वरळी मतदारसंघात 32 वर्षाच्या आदित्य यांनी आव्हान दिलं. आता वरळी मध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना पण घेऊन येत आहेत. मुख्यमंत्री येणार म्हणजे पोलीस घेऊन येणार. आम्ही वाट बघतो आहोत की हे राजीनामा देऊन येतात का? 32 वर्षाच्या तरुणाला सरकार घाबरत आहे, असं संजय राऊत म्हणालेत. ते नवी दिल्लीत माध्यमांशी बोलत होते.