जोपर्यंत बॅलेट पेपरवर… संजय राऊतांच्या त्या विधानाची सर्वत्र चर्चा, राज ठाकरेंसोबतच्या बैठकीत मोठा निर्णय

जोपर्यंत बॅलेट पेपरवर… संजय राऊतांच्या त्या विधानाची सर्वत्र चर्चा, राज ठाकरेंसोबतच्या बैठकीत मोठा निर्णय

| Updated on: Jun 06, 2026 | 11:27 AM

शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेत विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले. मात्र, यावेळी सर्वाधिक चर्चा झाली ती त्यांच्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीची.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेत विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले. मात्र, यावेळी सर्वाधिक चर्चा झाली ती त्यांच्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीची. संजय राऊत यांनी शिवतीर्थ येथे जाऊन राज ठाकरे यांची अचानक भेट घेतली. या भेटीनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले.

या भेटीबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, त्यांनी राज ठाकरे यांच्यासोबत अनेक अराजकीय विषयांवर चर्चा केली. साहित्य, संस्कृती आणि पर्यटन याबाबत राज ठाकरे यांना चांगली माहिती असून त्या विषयांवर दोघांमध्ये सविस्तर संवाद झाला.

यावेळी निवडणुकांबाबतही महत्त्वाची चर्चा झाल्याचे राऊत यांनी सांगितले. बॅलेट पेपरवर निवडणुका होत नाहीत तोपर्यंत निवडणुकांवर बहिष्कार टाकावा, अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हा मुद्दा आपण उद्धव ठाकरे यांच्यासमोरही मांडला असून त्यावर चर्चा होणे आवश्यक असल्याचे राऊत म्हणाले. आमदार फोडाफोडीच्या पार्श्वभूमीवर हा विचार देशभर पोहोचेल, असेही त्यांनी नमूद केले.

Published on: Jun 06, 2026 11:27 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us