एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत भाजपासोबत सत्तास्थापन करून मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलीयं. त्यानंतर राज्यात मंत्रीमंडळ विस्तार रखडला होता. 16 आमदारांवर कारवाईचे प्रकरण न्यायालयात असल्याने मंत्रीमंडळ विस्तार रखडल्याचे सांगितले जात होते. मात्र, आज अखेर शिंदे गट आणि भाजपाने मंत्रीमंडळ विस्तार केल्या आहे. भाजपाच्या एकून 9 आमदारांच्या गळ्यात मंत्री पदाची माळ पडलीयं. तर एकनाथ शिंदे गटाच्याही एकून 9 आमदारांच्या गळ्यात मंत्री मंडळाची माळ पडली आहे. मंत्री मंडळ विस्तारानंतर आता शंभूराज देसाईंनी प्रतिक्रिया दिलीयं. आज मंत्री मंडळ विस्तारामध्ये देसाईंनी देखील मंत्री पदाची शपथ घेतलीयं. देसाई माध्यमांशी बोलताना म्हणाले की, आमचा उठाव यशस्वी झालायं….