संजय पवार, बाजोरियांच्या पराभवामुळे शिवसेना आमदार आक्रमक झाले आहेत. विधान परिषद निवडणुकीमध्ये शिवसेनेची मतं शिवसेनेलाच मिळावीत असा आक्रमक पवित्रा शिवसेना आमदारांनी घेतला आहे. शिवसेनेला मदत न करणाऱ्या पक्षाला मतदान का करायचे असा सवाल आमदारांनी उपस्थित केला आहे. दुसरीकडे 4 मतांसाठी काँग्रेसचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव वाढत आहे. मात्र आमदार विरोधी भूमिका घेत असल्याने उद्धव ठाकरे यांच्यासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.