मुंबई : गोरगरिबांची दिवाळी गोड व्हावी, म्हणून सरकारने आनंदाचा शिधा दिली. त्यावेळी ती राज्यातील काही लोकांना मिळाली तर काहींना नाही. मात्र यावेळी अवकाळी मुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्याला आणि कष्टकऱ्याला गुढीपाडव्याला तरी मिळावा अशी अपेक्षा होती. त्यावरून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारला फटकारलं. तसेच याच शिधावरून सरकारवार टीका देखील केली आहे.
गुढीपाडव्यानिमित्ता आनंदाचा शिधा मिळणारा, अशी घोषणा राज्य सरकारने केली होती. मात्र अनेक ठिकाणी त्याचा पुरवठा झालेला नाही. यावरून संजय राऊत यांनी सरकारला फटकारलंय. ते म्हणाले, ‘दिवाळीचा शिधाही मिळालेला नाही. शिधा हा फक्त आमदारांना खोक्यात मिळतो. गरीबांना मिळत नाही असं म्हटलं आहे.