संतोष नलावडे, TV9 मराठी, प्रतिनिधी, सातारा : तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या एका विधानामुळे सध्या राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलंच तापलं आहे. सावंत यांच्या विधानावर भाजपचे नेते शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje Bhosale) यांनी आपलं मत मांडलं आहे. “मंत्र्यांनी मराठा समाजाच्या भावना लक्षात घेतल्या पाहिजेत. अशी विधानं करणं योग्य नाही”, असं शिवेंद्रराजे म्हणाले आहेत.