AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपाचे लोकसभेसाठी राज्यात ‘धन्यवाद मोदीजी’ अभियान; तर विधानसभा निवडणुकीसाठी ‘हा’ प्लॅन

भाजपाने आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. 'मिशन 45 'च्या पार्श्वभूमीवर आता राज्यात भाजपाच्या वतीने 'धन्यवाद मोदीजी' अभियान राबवण्यात येणार आहे.

भाजपाचे लोकसभेसाठी राज्यात 'धन्यवाद मोदीजी' अभियान; तर विधानसभा निवडणुकीसाठी 'हा' प्लॅन
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 26, 2022 | 12:08 PM
Share

मुंबई : भाजपाने (BJP) आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची (Election) जोरदार तयारी सुरू केली आहे. ‘मिशन 45 ‘च्या पार्श्वभूमीवर आता राज्यात भाजपाच्या वतीने ‘धन्यवाद मोदीजी’ (Narendra Modi) अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानाला 2 ऑक्टोबरपासून  सुरुवात होणार आहे. या अभियानातंर्गत भाजपाच्या वतीने केंद्र सरकारच्या योजनांच्या लाभार्थींशी संवाद साधण्यात येणार आहे. तसेच अशा लाभार्थ्यांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एकूण दहा लाख पत्र पाठवण्याचं नियोजन राज्य भाजपाच्या वतीने करण्यात आले आहे.

निर्मला सीतारमण यांचा दौरा

‘मिशन 45’ च्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन या पुणे दौऱ्यावर आल्या होत्या. त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला. हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. सध्या भाजपकडून राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर निर्मला सीतारमन यांनी हा दौरा आयोजित केला होता.

विधानसभेची तयारी

एकीकडे भाजपाकडून राज्यात आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू आहे. मात्र त्याचबरोबर भाजपाने विधानसभा निवडणुकीची तयारी देखील सुरू केल्याचं पहायला मिळत आहे.  विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकएक मतदारसंघ पिंजून काढा अशा सूचना भाजप पक्षश्रेष्ठींकडून मंत्र्यांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात भाजप मंत्र्यांकडून दौरे आयोजीत केले जाणार आहेत.

काय आहे भाजपाचे ‘धन्यवाद मोदीजी’ अभियान?

भाजपाकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात धन्यवाद मोदीजी अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न भाजप करणार आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दहा लाख पत्र देखील पाठवण्यात येणार आहे.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.