बीड: मराठा समाजावरील अन्याय सरकारने दूर करावा. अन्यथा मराठा समाजाला सरकारचं भविष्य ठरवावं लागेल, असा इशारा शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांनी दिला. राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात लवकरात लवकर निर्णय घेतला नाही तर पुन्हा एकदा राज्यात गेल्यावर्षीप्रमाणे मराठे मोर्चे सुरु होतील, असेही विनायक मेटे यांनी म्हटले.