मुंबई : शिवसेना नेते विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Ekanath Shinde) यांच्यावर टीका केली आहे. भाजपच्या ईडी कारवाईवर आणि एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केसं आहे. भाजपच्या ईडी कारवाईविरोधात आवाज उठवणारे पहिले मंत्री एकनाथ शिंदे होते. पण आता एकनाथ शिंदे भाजपच्या जवळ कसे गेले हे ईडीचे डायरेक्टरच सांगतील, असं विनायक राऊत (Vinayak Raut) म्हणाले आहेत.