नवी दिल्ली : भारतासह संपूर्ण जगामध्ये खंडग्रास सूर्यग्रहणाला (Solar eclipse) सुरुवात झाली आहे.भारतात 4.17 मिनिटांनी सूर्यग्रहण दिसायला सुरुवात झाली आहे. जम्मू, दिल्ली, अमृतसर (Amrutsar) या उत्तर भारतातील शहरांमध्ये सूर्यग्रहणाला सुरूवात झाली आहे. 2022 या वर्षीतल शेवटचं सूर्यग्रहण आहे. इटलीमधून सर्वप्रथम सूर्यग्रहण दिसण्यास सुरुवात झाली आहे. तसंच नॉर्वे आणि तुर्की या देशांमध्ये सूर्यग्रहण दिसत आहे. खगोलप्रेमींसाठी ही मोठी पर्वणी आहे.