मुंबई : राज्यातील इयत्ता दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा 23 एप्रिलपासून ऑफलाईन पद्धतीने होतेय. मात्र, याला दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांनी विरोध केलाय. याविरोधात मुंबईत शिवाजी पार्कवर विद्यार्थ्यांनी एल्गार केलाय. वर्षभर शिक्षण ऑनलाईन मग परीक्षा ऑफलाईन का? असा सवाल करत या विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलाय