मुंबई : एसटी महामंडळाने एक मोठा निर्णय घेतला आहे आणि तो म्हणजे यांत्रिकी कर्मचाऱ्यांना चालक म्हणून नेमणार व वाहतूक नियंत्रकांना वाहक म्हणून नेमणार आहे. आज कारोनाची परिस्थिती आटोक्यात येत आहे. शाळा तर सुरू होत आहेत आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तसेच रुग्णांना त्यांच्या विविध ठिकाणी जाण्यासाठी लाल परी शिवाय पर्याय नाही. त्यामुळे ही लालपरी लवकरात लवकर सुरू झाली पाहिजे आणि जे कर्मचारी अजूनही आंदोलन करत आहे त्यांनी लवकरात लवकर कामावर रुजू व्हावे आणि आपली लाल्परी पुन्हा सुरू झाली पाहिजे. शासनाने निर्णय ग्रामीण जनतेची काळजी तसेच एसटी कर्मचाऱ्यांची देखील शासनाला काळजी आहे. त्यामुळे लाल परी ही कोणत्याही परिस्थितीत लवकरात लवकर सुरू झाली पाहिजे अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या आमदार तथा प्रवक्त्या डॉ. मनीषा कायंदे यांनी दिली.