मुंबई: कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे सातारा, अहमदनगर आणि बारामतीमध्ये कडक लॉकडाऊन लावण्यात आलं आहे. तर, दुसरीकडे सांगली मनपा क्षेत्रात जनता कर्फ्यू पाळण्यात येणार आहे. लोकप्रतिनिधी आणि सांगली मनपा प्रशासन यांनी सहमतीनं हा निर्णय घेतला आहे. 5 मे पासून सात दिवस जनता कर्फ्यू लागणार आहे. जनता कर्फ्यूच्या काळात 11 वाजेपर्यंत किराणा व भाजी विक्री साठीं होम डिलिव्हरीला परवानगी देण्यात येणार आहे.