निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?

निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?

| Updated on: Sep 15, 2026 | 4:14 PM

शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. शिंदे गटाचे वकील नीरज किशन कौल यांनी युक्तिवाद करताना शिवसेनेच्या १९९९ च्या घटनेचा, प्रतिनिधी सभेच्या महत्त्वाचा आणि निवडणूक आयोगाच्या अधिकारांचा उल्लेख केला. उद्धव ठाकरे यांनी पक्षातील लोकशाही संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केल्याचा दावाही कौल यांनी केला.

शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सध्या महत्त्वाची सुनावणी सुरू आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होत असून, शिंदे गटाचे वकील नीरज किशन कौल युक्तिवाद करत आहेत. कौल यांनी यापूर्वीच्या सुनावणीत १९९९ च्या शिवसेना घटनेबद्दल माहिती दिली होती आणि आता त्याच मुद्द्यावर ते पुढील युक्तिवाद करत आहेत. नीरज किशन कौल यांनी न्यायालयाला शिवसेनेच्या घटनेतील तरतुदी समजावून सांगितल्या.

पक्षप्रमुखाची नेमणूक प्रतिनिधी सभेच्या बैठकीनंतर होते, असे त्यांनी नमूद केले. तसेच, शिवसेनेच्या घटनेत प्रतिनिधी सभेला विशेष महत्त्व असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. निवडणूक आयोगाने शिवसेना प्रकरणी दिलेला निर्णय योग्यच असून, आयोगाला असा अधिकार आहे, असा जोरदार युक्तिवाद कौल यांनी केला. बाळासाहेब ठाकरे यांनीही निवडणूक आयोगाचे अधिकार मान्य केले होते, असे त्यांनी न्यायालयासमोर सांगितले. उद्धव ठाकरे यांनी पक्षातील लोकशाही संपवून सर्व अधिकार स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न केल्यामुळे पक्षात असंतोष निर्माण झाल्याचा दावाही कौल यांनी केला. या प्रकरणाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे.

Published on: Sep 15, 2026 4:14 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us