या पोस्टवर बोलताना सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या, काही लोकांनी त्यांच्या वॉलवर काहीतरी लिहलं आहे. जे काही झालं ते अत्यंत दुर्दैवी आहे. मी केतकी चितळेला ओळखत नाही. मात्र मी मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस, आणि राज ठाकरेंचे आभार मानते, ही विकृती समाजासाठी अत्यंत वाईट आहे, ही वेळ कुणावरही येऊ शकते, त्यासाठी सर्वांनी एकत्र येण गरजेचं आहे, अशाही सुप्रिया सुळे म्हणाल्या. तसेच मी ज्या मराठी संस्कृतीत वागले ते त्या संस्कृतीत हे बसत नाही, पवारांनी आजपर्यंत असा कुणाबद्दल शब्द नाही काढला, असे त्यानी आवर्जून सांगितले.