मुंबई : मेघालयची विधानसभा निवडणूक, निकाल आणि सत्तास्थापनेवरून सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारले आहेत. त्यांनी 2014 च्या विधानांचाही त्यांनी दाखला दिला आहे. 2014 मध्ये भारत देश खूप विश्वासाने नरेंद्र मोदींच्या मागे उभा राहिला होता. तेव्हा नरेंद्र मोदी म्हणाले होते की, ना खाऊंगा ना खाने दूंगा! अमित शाह आधी भ्रष्टाचारी म्हणाले, पुन्हा त्यांच्यासोबत जात सरकार बनवलं. मग ना खाऊंगा ना खाने दूंगा याचं काय झालं?, असा खोचक सवाल सुप्रिया सुळे यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना केला आहे.