“मागण्या मान्य करा, अन्यथा मुंबईच्या अरबी समुद्रात जलसमाधी घेणारच”, रविकांत तुपकर आंदोलनावर ठाम

| Updated on: Nov 24, 2022 | 8:44 AM

रविकांत तुपकर आंदोलनावर ठाम

Follow us on

शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं (Swabhimani Shekari Sanghatana) आंदोलन सुरु आहे. मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर अरबी समुद्रात जलसमाधी घेऊ असा इशारा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी दिलाय.सोयाबीन आणि कापसाला हमीभाव देण्याच्या मागणीसाठी शेतकरी रस्त्यावर उतरलेत. त्या पार्श्वभूमीवर मानखुर्दमध्ये मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.