राज ठाकरेंच्यामध्ये मी कधीही सातत्य पाहिलं नाही. याच्यापुढे पाहायला मिळेल की नाही हेही माहित नाही. त्यामुळे त्याची भूमिका मी कधीही गांभीर्याने घेत नाही. त्यांनी केंद्र सरकारवरती टीका केल्याचं सगळ्या महाराष्ट्रांनी पाहिलं आहे. त्यामुळं प्रत्येकवेळी ते आपली भूमिका बदलत असतात. काल त्यांनी महाराष्ट्रातल्या सत्तेत असलेल्या नेत्यांवरती टीका केल्याने राज ठाकरेंच्या भाषणाची सर्वत्र चर्चा आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राज ठाकरेंच्या भाषणाचा खरपूस समाचार घ्यायला सुरूवात केली आहे.