VIDEO : TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 11 AM | 19 June 2022

| Updated on: Jun 19, 2022 | 12:13 PM

भाजपचे सरकार विरोधी पक्षांना त्रास देण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचे सातत्याने बोलले जात आहे. विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी, त्यांना भिती घालण्यासाठी या यंत्रणांचा सर्सास गैरवापर सुरु आहे. विधान परिषद निवडणुकीतही या यंत्रणांच्या माध्यमातून आमदारांवर दबाव टाकला जात आहे. आमदारांना थेट फोन केले जात आहेत, असा थेट आरोप केला आहे.

Follow us on

भाजपचे सरकार विरोधी पक्षांना त्रास देण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचे सातत्याने बोलले जात आहे. विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी, त्यांना भिती घालण्यासाठी या यंत्रणांचा सर्सास गैरवापर सुरु आहे. विधान परिषद निवडणुकीतही या यंत्रणांच्या माध्यमातून आमदारांवर दबाव टाकला जात आहे. आमदारांना थेट फोन केले जात आहेत, असा थेट आरोप केला आहे. कालच्या बैठकीत रणनीती तयार झाली. 20 तारखेला महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकून येतील अशी तयारी झालेली आहे. आज देखील महाविकास आघाडीची बैठक आहे. त्या बैठकीमध्ये सुद्धा पुन्हा रणनीती तयार केली जाईल. काही अडचण येणार नाही असं मला वाटतं आहे, असं नाना पटोले यांनी सांगितलं.