दसरा मेळाव्यावरून शिंदे गट आणि शावसेनेत रस्सी खेच दिसून येत आहे. दसरामेळाव्यात शिंदे गटात अनेकांचा प्रवेश होईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. तर सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीनंतर अनेकांचे धाबे दणानल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. आता दसरा मेळावा उत्साहात साजरा करायचा असेही ते म्हणाले. तर शिवसेनेच्या अयोध्या पौळ यांना धमकी प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आमदार संतोष बांगरसह इतर चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर उदय सामंत यांनी शिवसेनेवर हल्ला करताना पालिकेत कुणी खोके घेतले हे आम्हाला माहिती असल्याचं म्हटलं आहे.