तुकाराम मुंढेंच्या भीतीने जुनी परंपरा मोडली! बऱ्याच काळापासूनची पुण्यातील प्रसिद्ध खाऊगल्ली बंद?

तुकाराम मुंढेंच्या भीतीने जुनी परंपरा मोडली! बऱ्याच काळापासूनची पुण्यातील प्रसिद्ध खाऊगल्ली बंद?

| Updated on: Aug 23, 2026 | 3:43 PM

चिंचवडमध्ये तुकाराम मुंडे यांच्या कार्यक्रमादरम्यान खाऊ गल्ली बंद ठेवण्यात आल्याने चर्चांना उधाण आले होते. ही बंद मुंडेंच्या धास्तीपोटी की वाहतूक कोंडीमुळे, यावर तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र, एका दुकानदाराने स्पष्ट केले की, ही तात्पुरती बंद आरटीओच्या सूचनेनुसार, पार्किंग आणि वाहतूक व्यवस्थापनासाठी करण्यात आली होती.

चिंचवड येथील तुकाराम मुंडे यांच्या कार्यक्रमादरम्यान स्थानिक खाऊ गल्ली पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्याचा एक व्हिडिओ समोर आल्यानंतर विविध चर्चांना उधाण आले होते. ही खाऊ गल्ली मुंडे यांच्या धास्तीपोटी बंद करण्यात आली की वाहतूक कोंडीमुळे, यावर समाजमाध्यमांवर अनेक तर्कवितर्क लढवले जात होते.

या घटनेची पडताळणी करण्यासाठी टीव्ही नाईन मराठीच्या प्रतिनिधींनी घटनास्थळी जाऊन काही दुकानदारांशी संवाद साधला. एका दुकानदाराने स्पष्ट केले की, खाऊ गल्ली बंद ठेवण्यामागे तुकाराम मुंडे यांची भीती हे कारण नव्हते. तर, आरटीओच्या निर्देशानुसार पार्किंग आणि वाहतूक व्यवस्थापनासाठी त्यांना दुकाने तात्पुरती बंद ठेवण्यास सांगण्यात आले होते. विशेष म्हणजे, यापूर्वीही अधिकाऱ्यांनी येऊन दुकानांचे फूड लायसन्स तपासले होते. गर्दीमुळे वाहतुकीची समस्या निर्माण होऊ नये, यासाठीच ही खबरदारी घेण्यात आली होती, असे दुकानदाराने सांगितले. यामुळे, खाऊ गल्ली बंद होण्यामागील खरी वस्तुस्थिती समोर आली आहे.

Published on: Aug 23, 2026 3:38 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us