मुंबई : मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप आणि भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांच्यात ट्विटरवॅार रंगला. MPSC च्या परिक्षा रद्द झाल्यावर रस्त्यांवर लोळणारे नेते कुठे गायब झाले? असा भाई जगताप यांनी ट्विटरवरुन केला आहे. तर मुंबईत वादळ आल तेव्हा मुंबई महापालिकेतले विरोधी पक्षनेते कुठल्या बिळात लपून बसले, असा सवाल करीत पडळकरांनी उत्तर ट्विटला उत्तर दिले आहे.