रत्नागिरी : उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज रत्नागिरीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या कामाचं कौतुक केलंय. तर ठाकरे गटासह मविआला टोला लगावला आहे. ज्या पद्धतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस महाराष्ट्रात काम करत आहे.त्यामुळे काही लोकांना दुःख होतंय. त्यामुळे निराशेच्या भावनेतून वक्तव्यं केली जात आहेत, असं म्हणत उदय सामंत यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.