Uddhav Thackeray Speech Aurangabad | हिंदुत्त्व, काश्मिरी पंडित, औरंगाबाद पाणी प्रश्न… मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

| Updated on: Jun 08, 2022 | 11:46 PM

औरंगाबादच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा पार पडली. या सभेला राज्यभरातून हजारो शिवसैनिक औरंगाबादेत दाखल झाले होते. त्यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीकेचे बाण सोडले.

Follow us on

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादेतील सभेतून भाजप आणि मनसेवर जोरदार हल्ला चढवला. औरंगाबादच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा पार पडली. या सभेला राज्यभरातून हजारो शिवसैनिक औरंगाबादेत दाखल झाले होते. त्यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीकेचे बाण सोडले. ‘काश्मिरी पंडितांनी पुन्हा घरं सोडली आहेत. घरात, शाळेत जाऊन गोळ्या घातल्या जात आहेत. हिंमत असेल तर काश्मिरमध्ये जाऊन हनुमान चालिसा वाचा. मर्द असाल तर पहिले काश्मिरी पंडितांची सुरक्षा करा’, असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिलं. त्याचबरोबर अन्य मुद्द्यावरुनही त्यांनी भाजप आणि विरोधकांवर हल्ला चढवला.