मुंबई : भाजप खासदार उन्मेश पाटील (Unmesh Patil) यांनी वेदांता प्रकल्पावर भाष्य केलंय.”हा प्रकल्प गुजरातला गेला कसा याची CBI चौकशी करा. पानी का पानी झालंच पाहिजे”, असं उन्मेश पाटील म्हणाले आहेत. शिवाय त्यांनी आदित्य ठाकरेंवरही (Aditya Thackeray) टीका केली आहे. फॉक्सकॉन वेदांता प्रकल्पाच्या मुद्द्यावरून भाजपवर आरोप करण्यापूर्वी आदित्य ठाकरे यांनी अंतर्मनाला विचारलं पाहिजे. आपण जेव्हा मंत्री होते तेव्हा पॉलिसी मेकर म्हणून किती दिवस सभागृहात या विषयाचा पाठपुरावा केला याचा विचार केला पाहिजे, असं उन्मेश पाटील म्हणालेत.