एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेना अडचणीत आली आहे. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर पेच निर्माण झालाय. महाविकास आघाडी सरकार कधीही कोसळू शकतं, असंही बोललं जातंय. तिकडे एकनाथ शिंदे यांच्यासोबत 41 पेक्षा जास्त आमदार असल्याची माहिती समोर आली आहे. आता याच सर्व पार्श्वभूमीवर दिल्लीतील महाराष्ट्र सदनात मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलीये. कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये, यासाठी काळजी घेतली जातीयं. दोन तृतीआंश शिवसेना आमदार एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्याची माहिती आहे. या संपूर्ण प्रकरणावर राष्ट्रवादीची भूमिका काय आहे. हे विचारलं जात होतं. यातच आता राष्ट्रवादीनंही भूमिका मांडली आहे.