बंडाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बंडखोरांना चर्चेसाठी समोर येण्याचं आवाहन केले. तसेच आपण आमदारांना भेटत नव्हतो याची कबुलीही त्यांनी दिली. आजारपण आणि कोरोनाचा काळ यामुळे भेटत नसल्याचंही त्यांनी सांगितलं. आता चर्चा सुरू झालीये ती म्हणजे कुणाकडे किती आमदार? आहेत, यावर. एकनाथ शिंदे यांच्याकडे सध्या 42 आमदार असल्याचा दावा त्यांनी केल्यास, तसेच याबाबतचा फोटोही त्यांनी शेअर केला आहे. बाकी उरलेले आमदार हे शिवसेनेकडेच आहेत. शिरसाट यांच्या पत्रातील एका वाक्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भावनिक भाषणावर बोळा फिरवला आहे. शिरसाट यांनी आपल्या पत्रातून थेट ठाकरे यांच्या कार्यशैलीवरच बोट ठेवले आहे.