पावसात भूस्खलनाचा धोका असलेल्या पुण्यातल्या भोर तालुक्यातील गावांची पहाणी प्रशासकिय यंत्रणांकडून करण्यात आलीयं. भूस्खलनाचा धोका असलेल्या गावांमध्ये, खबरदारी म्हणून प्रशासनाकडून आधिच उपाययोजना करण्यात येतायत. मागच्या वर्षी या ठिकाणी जवळपास 30 ठिकाणी भूस्खलन होऊन 30 ते 40 गावांचा संपर्क तुटला होता. या दरम्यान मदत मिळण्यास उशीर झाल्यानं याठिकाणच्या नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले होते. त्यामुळं यंदा खबरदारी म्हणून आधिच प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येतायत त्याचं बरोबर पुन्हा अश्या प्रकारची स्थिती उद्भवली तर त्याला सामोर जाण्यासाठीचं मार्गदर्शनही नागरिकांना केल गेलयं. यावेळी भोरचे प्रांतधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार सचिन पाटील, पोलीस प्रशासन यांच्यासह संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा यावेळी उपस्थित होती.