वाचली! रेल्वे मोटरमनच्या प्रसंगावधनामुळे वाचली!

| Updated on: May 30, 2022 | 6:32 PM

त्यामुळे महिलेला पुढे जाता येईना आणि ती रुळावर पडली. या महिलेचे रेल्वे मोटरमनच्या प्रसंगावधनामुळे प्राण वाचले (Rescued) आहेत. प्रतितास 100 किमीचा वेग असलेली रेल्वे (Railway) अवघ्या 20 सेकंदात थांबवून या महिलेला सुखरुप (Safe) रेल्वे रुळावर बाहेर काढण्यात आले

Follow us on

औरंगाबाद: औरंगाबाद (Aurangabad City) शहरातील चिखलठाना रेल्वे रूळ परिसरात एक महिला रेल्वे रुळ ओलांडत होती. रेल्वे रुळ ओलांडत असताना महिलेचा पाय रुळात अडकला. त्यामुळे महिलेला पुढे जाता येईना आणि ती रुळावर पडली. या महिलेचे रेल्वे मोटरमनच्या प्रसंगावधनामुळे प्राण वाचले (Rescued) आहेत. प्रतितास 100 किमीचा वेग असलेली रेल्वे (Railway) अवघ्या 20 सेकंदात थांबवून या महिलेला सुखरुप  रेल्वे रुळावर बाहेर काढण्यात आले. औरंगाबाद शहरातील चिखलठाना रेल्वे रूळ परिसरात ही चित्त थरारक घटना घडली आहे.