Pankaj Bhoyar | जिल्हा परिषद, पंचायत समितीचा निकाल थोड्याच वेळात; कोण जिंकणार? महायुती की महाविकास आघाडी?
राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितींच्या निवडणुका 7 फेब्रुवारी रोजी पार पडल्या असून आज दि.9 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.00 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. या निवडणुकांमध्ये नेमकी बाजी कोण मारणार? महायुती की महाविकास आघाडी? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितींच्या निवडणुका 7 फेब्रुवारी रोजी पार पडल्या असून आज दि.9 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.00 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. या निवडणुकांमध्ये नेमकी बाजी कोण मारणार? महायुती की महाविकास आघाडी? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री पंकज भोयर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी राज्यात पार पडलेल्या नगरपालिका व महानगरपालिका निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील जनतेचा कल स्पष्टपणे भाजप आणि महायुतीच्या दिशेने दिसून आला आहे. महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजप व महायुतीला मोठ्या प्रमाणात यश मिळाले असून, त्याचाच परिणाम जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्येही दिसून येईल, असा ठाम विश्वास पंकज भोयर यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे या निवडणुकांमध्येही भाजप आणि महायुतीला मोठ्या प्रमाणात यश मिळेल, असा दावा त्यांनी केला.
