AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Solapur : 10 किलो कांद्याच्या भावात एक कोथिंबीरीची जुडी, अल्पावधीत विक्रमी उत्पादन

शेती मालाच्या उत्पादनापेक्षा बाजारपेठेत त्याला काय दर आहेत यावरच शेतकऱ्यांचे अर्थकारण ठरते. शिवाय आवक घटून मागणी वाढली की मालाच्या किंमतीमध्ये वाढ होणार हे बाजारपेठेचे सूत्रच आहे. त्याप्रमाणेच कोथिंबीरची अवस्था आहे. उन्हाळी हंगामातील कोथिंबीरच्या उत्पादनात घट झाली आहे. सध्या लग्नसराई जोमात सुरु असून कोथिंबीरच्या मागणीत वाढ होत आहे.

Solapur : 10 किलो कांद्याच्या भावात एक कोथिंबीरीची जुडी, अल्पावधीत विक्रमी उत्पादन
कोथिंबीर
| Edited By: | Updated on: May 31, 2022 | 12:33 PM
Share

सोलापूर : मुख्य पिकांच्या दरापेक्षा गेल्या काही दिवसांपासून (Vegetable) भाजीपाल्यातील घसरते आणि विक्रमी दराची चर्चा जोरात सुरु आहे. आतापर्यंत कांद्याच्या घटत्या दरावरुन वेगवेगळे आकडे समोर येत आहेत. (Solapur Market) सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यंदा कांद्याची विक्रमी आवक झाली होती. एवढेच नाही तर सर्वात निच्चांकी दरही याच बाजारेपेठत मिळाला आहे. आता एका (Cilantro) कोथिंबिरीच्या जुडीमध्ये 10 किलो कांदा येईल अशी स्थिती निर्माण झाली आहे. कारण सध्या कोथिंबीरची जुडी 20 रुपयाला एक अशी स्थिती आहे. त्यामुळे कोथिंबीर उत्पादकांना अच्छे दिन आल्याचे चित्र बाजारपेठेमध्ये पाहवयास मिळत आहे.

मागणी वाढल्याने विक्रमी दर

शेती मालाच्या उत्पादनापेक्षा बाजारपेठेत त्याला काय दर आहेत यावरच शेतकऱ्यांचे अर्थकारण ठरते. शिवाय आवक घटून मागणी वाढली की मालाच्या किंमतीमध्ये वाढ होणार हे बाजारपेठेचे सूत्रच आहे. त्याप्रमाणेच कोथिंबीरची अवस्था आहे. उन्हाळी हंगामातील कोथिंबीरच्या उत्पादनात घट झाली आहे. सध्या लग्नसराई जोमात सुरु असून कोथिंबीरच्या मागणीत वाढ होत आहे. केवळ जिल्हाभरातूनच नाही तर उस्मानाबाद, बीड, परंडा, शिरूर, चाकण या भागातून मोठी मागणी आहे. त्यामुळे 5 रुपायाला मिळणारी कोथिंबीरची जुडी आता 20 रुपयांपर्यंत पोहचली आहे.

अधिकच्या उन्हामुळे उत्पादनात घट

वातावरणातील बदलाचा परिणाम भाजीपाल्यावरही झाला आहे. कोथिंबीर हे अल्पावधीचे पीक असले तरी मध्यंतरी पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात उन्हाचा कडाका वाढला होता. त्यामुळे कोथिंबीर वाढीवर त्याचा परिणाम झाला होता. त्यामुळे उत्पादन घटले शेतकऱ्यांना आता अधिकचा दर मिळत असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. यंदा कोथिंबीरच्या लागवडीमध्ये मुळातच घट झाली होती. यातच निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनात घट झाली होती. याचा परिणाम म्हणून कोथिंबीरच्या जुडीला 20 रुपये तर दुसरीकडे कांद्याला 2 रुपये किलो असा दर आहे.

दोन एकरातून लाखोंचे उत्पन्न

सोलापूर जिल्ह्यातील राजुरी येथील शेतकरी राजेंद्र भोसले यांनी तब्बल 2 एकरामध्ये कोथिंबीरची लागवड केली होती. लागवडीपासून पाण्याचे योग्य नियोजन केल्याने मागणी असतानाच कोथिंबीर ही विक्रीसाठी बाजारपेठेत दाखल झाली आहे. त्यामुळे कोथिंबीरमधून भोसले यांना लाखोंचे उत्पादन मिळणार आहे. त्यामुळे कोणत्या पिकातून शेतकऱ्याला लाभ मिळेल हे न सांगता येण्यासारखे आहे. कांद्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी तर कोथिंबीरमुळे आनंदाश्रु अशी अवस्था झाली आहे.

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.