AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फुलांच्या उत्पादनात 50 टक्क्यांची घट तर दरामध्ये दुप्पट वाढ, काय आहेत कारणे ?

लग्नसराई आणि मार्गशीर्ष महिन्यामुळे फुलांच्या मागणीत दुपटीने वाढ झाली आहे. तर दुसरीकडे अवकाळीमुळे फुलांच्या उत्पादनात कमालीची घट झालीय. याचा परिणाम फुलांच्या दरावर झाला असून गत महिन्याच्या तुलनेत फुलांचे दर हे दुपटीने वाढलेले आहेत.

फुलांच्या उत्पादनात 50 टक्क्यांची घट तर दरामध्ये दुप्पट वाढ, काय आहेत कारणे ?
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: | Updated on: Dec 14, 2021 | 4:59 PM
Share

कोल्हापूर : मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी झाला की त्याचे दर वाढणारच हे बाजारातले सुत्रच आहे. अगदी त्याचप्रमाणे सध्या फुलांचे होत आहे. लग्नसराई आणि मार्गशीर्ष महिन्यामुळे (Increase in flower prices) फुलांच्या मागणीत दुपटीने वाढ झाली आहे. तर दुसरीकडे ( impact of untimely rains) अवकाळीमुळे फुलांच्या उत्पादनात कमालीची घट झालीय. याचा परिणाम फुलांच्या दरावर झाला असून गत महिन्याच्या तुलनेत फुलांचे दर हे दुपटीने वाढलेले आहेत. मागणीच्या तुलनेत पुरवठा हा स्थानिक बाजारपेठेत आहे ना राज्यातील महत्वाच्या बाजारपेठेत त्यामुळे दर वाढले असले तरी उत्पादनातच घट असल्याने त्याचा पाहिजे त्या प्रमाणात शेतकऱ्यांना देखील फायदा झालेला नाही.

अजून महिनाभर फुलांचा सुंगध दरवळणारच

सर्वच फुलांची टंचाई सध्या बाजारपेठेत जाणवत आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत झेंडू, निशिगंध, शेवंती, जरबेरा या फुलांच्या किंमतीमध्ये दुपटीने वाढ झालेली आहे. शिवाय सध्या लग्नसराई सुरु आहे. त्यामुळे मागणीत वाढ कायम असून अजून महिनाभर असेच चढे दर राहतील असा अंदाज व्यापारी वर्तवत आहेत. महिनाभरापूर्वी 5 रुपायाला 1 जरबेराचे फुल होते तेच आज 10 रुपयांवर गेले आहे. त्यामुळे मागणी वाढल्याचा परिणाम सर्वच फुलांवर झालेला आहे.

यामुळे वाढले दर

15 दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळीचा परिणाम जसा पिकांवर झालेला आहे त्याचप्रमाणे तो फुलांवरही झालेला आहे. वातावरणातील बदलामुळे फुलांवर देखील करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे फुलांची तोडणी देखील मुश्किल झाली होती. अनेक बागा करप्याच्या प्रादुर्भावामुळे नष्ट झाल्या होत्या. त्यातच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लादण्यात आलेल्या नियमांत शिथिलता आल्याने लग्नसराई मोठ्या उत्साहात पार पडत आहे. त्यामुळे फुलांच्या मागणीत वाढ होत आहे.

बाजारपेठेतील फुलांचे दर

गतमहिन्यात निशिगंध हे 50 ते 60 रुपये किलो असे दर होते. आता मात्र, यामध्ये दुपटीने वाढ झाली आहे. सध्या 110 रुपये किलो असून मध्यंतरी तर मागणी वाढल्याने 150 रुपयांवर दर गेले होते. आता झेंडू 150 ते 200, शेवंती-80 ते 100 निशिगंध 100 ते 150 तर गुलाबाचे एक फुल हे 12 ते 15 रुपयांना मिळत आहे. त्यामुळे फुलांच्या दरात दुपटीने वाढ झाली असली तरी उत्पादनही त्याच प्रमाणात घटले आहे.

संबंधित बातम्या :

Latur Market | सोयाबीनचे दर घटले अन् पुन्हा स्थिरावले, शेतकऱ्यांची मात्र द्विधा मनस्थिती

पंतप्रधान पीक विमा योजना : शेतकऱ्यांना 100 रुपयांच्या प्रीमियमवर किती मिळते नुकसानभरपाई?

PM-kisan Scheme : योजनेतील निधी थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्येच, काय बदल केले आहेत मोदी सरकारने ?

चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...