AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Latur Market | सोयाबीनचे दर घटले अन् पुन्हा स्थिरावले, शेतकऱ्यांची मात्र द्विधा मनस्थिती

डिसेंबर महिन्याच्या सुरवातीला 6 हजार 600 रुपये दर झाला होता. तेव्हापासून कुठे अधिकची आवक होत असताना पुन्हा दरात घट झाली आहे. आता 6 हजार 200 रुपयांवर गेल्या तीन दिवसांपासून दर आहेत. तर दुसरीकडे सोयाबीनची विक्री करावी का साठवणूक हा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात कायम आहे.

Latur Market | सोयाबीनचे दर घटले अन् पुन्हा स्थिरावले, शेतकऱ्यांची मात्र द्विधा मनस्थिती
लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती
| Edited By: | Updated on: Dec 14, 2021 | 4:04 PM
Share

लातूर : हंगामाच्या सुरवातीपासून सोयाबीनच्या दरात ना विक्रमी वाढ झाली आहे ना ते निचांकी आलेले आहेत. मात्र, शेतकऱ्यांचा विश्वास आणि (Market) बाजारपेठेतील चढ-उतारामुळे (Soybean) सोयाबीन कायम चर्चेत राहिलेले आहे. डिसेंबर महिन्याच्या सुरवातीला (Soybean Rate) 6 हजार 600 रुपये दर झाला होता. तेव्हापासून कुठे अधिकची आवक होत असताना पुन्हा दरात घट झाली आहे. आता 6 हजार 200 रुपयांवर गेल्या तीन दिवसांपासून दर आहेत. तर दुसरीकडे सोयाबीनची विक्री करावी का साठवणूक हा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात कायम आहे. गेल्या 15 दिवसांमध्ये सोयाबीनच्या दरात 250 रुपयांची घसरण झालेली आहे. तर 8 हजार पोत्यांवरील आवक ही आता 12 हजारांवर आलेली आहे. गेल्या तीन दिवसांपासून लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला 6 हजार 250 चाच दर मिळत आहे. त्यामुळे आता सोयाबीनची आवक वाढणार का पुन्हा शेतकरी साठवणूकीवर भर देणार हे पहावे लागणार आहे.

शेतकरी घेत आहेत बाजारभावाचा अंदाज

खरीप हंगाम अंतिम टप्प्यात आला असताना देखील सोयाबीनच्या दरातील अनियमितता ही ना शेतकऱ्यांच्या लक्षात आली आहे ना व्यापाऱ्यांच्या. आता सोयापेंडच्या आयातीली स्थगिती देण्यात आली आहे. शिवाय साठामर्यादेची अटही व्यापारी किंवा प्रक्रिया उद्योजकांवर राहणार नाही. त्यामुळे सोयाबीनचे दर वाढतील असा अंदाज बांधण्यात आला होता. पण सोयाबीनच्या दरात वाढ तर झालीच नाही पण 200 ते 250 रुपयांनी घसरण झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून तर दर हे स्थिरच आहेत. आवक मात्र, 10 ते 12 हजार पोत्यांची होत आहे. त्यामुळे शेतकरी आता बाजाराचा अंदाज घेऊनच पुन्हा सोयाबीन विक्रीचा निर्णय घेणार असल्याचे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

हमीभावाबाबत निर्णयच नाही

नविन तूरीची आवक आता वाढत आहे. पांढरी तूर बाजारात दाखल होत असून या तूरीला हमीभाव केंद्रावर 6 हजार 300 दर निश्चित करण्यात आला आहे. मात्र, बाजारपेठेत 5 हजार 900 रुपायांनी तू विक्रीची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढावलेली आहे. त्यामुळे हमीभाव केंद्र सुरु करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. मात्र, याबाबत कोणतीही हलचाल बाजार समितीच्या आवारात दिसत नाही. त्यामुळे व्यापारी ठरवतेल तोच दर सध्या शेतकऱ्यांना मिळत आहे. ‘नाफेड’ ने लवकरात लवकर खरेदी केंद्र सुरु करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.

इतर शेतीमालाचे कसे आहेत दर

लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुपारी 12 च्या दरम्यान शेतीमालाचे सौदे होतात. मंगळवारी लाल तूर- 6190 रुपये क्विंटल, पांढरी तूर 6275 रुपये क्विंटल, पिंकू तूर 6221 रुपये क्विंटल, जानकी चना 4960 रुपये क्विंटल, विजय चणा 4900, चना मिल 4750, सोयाबीन 6671, चमकी मूग 7265, मिल मूग 6000 तर उडीदाचा दर 7601 एवढा राहिला होता.

संबंधित बातम्या :

पंतप्रधान पीक विमा योजना : शेतकऱ्यांना 100 रुपयांच्या प्रीमियमवर किती मिळते नुकसानभरपाई?

PM-kisan Scheme : योजनेतील निधी थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्येच, काय बदल केले आहेत मोदी सरकारने ?

Rabbi Season | रब्बी पिकांची उगवण होताच किडीचा प्रादुर्भाव, किड व्यवस्थापनासाठी महत्वाची बातमी

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.