AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजीपाल्याच्या शेतीने शेतकऱ्याचे बदलले भाग्य, वर्षभरात १२ लाखांची कमाई

या शेतकऱ्याचे भाग्य भाजीपाला लागवडीमुळे उजाळले. वर्षभरात या शेतकऱ्याने भाजीपाला विक्रीतून १० ते १२ लाख रुपयांची कमाई केली.

भाजीपाल्याच्या शेतीने शेतकऱ्याचे बदलले भाग्य, वर्षभरात १२ लाखांची कमाई
Govinda Hatwar
Govinda Hatwar | Updated on: May 05, 2023 | 9:00 PM
Share

मुंबई : शेतकरी आता धान-गहू याशिवाय अन्य पिकांची शेती करत आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. फळबाग लागवडीनंतर आता भाजीपाल्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जात आहे. भाजीपाला लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढताना दिसून येत आहे. हजारो रुपये उत्पन्न मिळवणारे शेतकरी आता लाखो रुपये मिळवू लागले आहेत. आता आम्ही तुम्हाला अशाच एका शेतकऱ्याबद्दल सांगणार आहोत. या शेतकऱ्याचे भाग्य भाजीपाला लागवडीमुळे उजाळले. वर्षभरात या शेतकऱ्याने भाजीपाला विक्रीतून १० ते १२ लाख रुपयांची कमाई केली.

शेती समजून घेतली

आज तकच्या रिपोर्टनुसार, राजस्थानातील भीलवाडा येथील हा शेतकरी आहे. रामेश्वर सुथार असं यांचं नाव. रामेश्वर हे खूप शिकलेले नाहीत. त्यांनी माध्यमिक शिक्षण घेतले. सुरुवातीला ते इलेक्ट्रिक मोटार रिवायडिंगचा काम करत होते. त्यात त्यांचे मन लागत नव्हते. अशात त्यांचा परिचय महाराष्ट्रातील प्रगतशील शेतकरी उमेश गाडे यांच्याशी झाला. उमेश गाडे यांच्याकडून रामेश्वर यांनी शेती समजून घेतली.

पाच वर्षांसाठी जमीन भाड्याने

रामेश्वर सुथार यांनी पाच वर्षांसाठी जमीन भाड्याने घेतली. या शेतीत ते स्ट्राबेरी उगवतात. यातून त्यांना लाखो रुपये मिळत आहेत. उमेश गाडे यांचे उत्पन्न पाहून रामेश्वर यांनीही शेती सुरू केली. त्यानंतर रामेश्वर यांनी भाजीपाल्याची लागवड केली. टमाटर, शिमला मिरची आदींची लागवड केली. याशिवाय ते गोबीचेही उत्पन्न घेतात. यातून रामेश्वर यांना चांगला फायदा झाला.

ड्रीप एरीगेशनच्या माध्यमातून सिंचन

रामेश्वर सुथार यांनी एक टमाटर ग्रेडिंग मशीन बनवली आहे. या मशीनने ते वेगवेगळ्या आकाराचे टमाटर वेगळे काढतात. त्यानंतर पॅकेजिंग करून बाजारात पाठवले जाते. आता ते औषध फवारणी मशीनही बनवणार आहेत.

ड्रीप एरिगेशनच्या माध्यमातून ते सिंचन करतात. यामुळे पाण्याची बचत होते. रोपांना चांगले पाणी मिळते. सध्या ते वर्षभर भाजीपाला विकून १० ते १२ लाख रुपये मिळवतात. याशिवाय ते इतर पिकांचेही उत्पन्न घेतात.

Follow Us
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...
राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार? पुण्यातील गुप्त बैठकीत नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार? पुण्यातील गुप्त बैठकीत नेमकं काय घडलं?.
NEET परीक्षेबाबत मोठा निर्णय! परीक्षेसाठी 15 मिनिटे अतिरिक्त वेळ......
NEET परीक्षेबाबत मोठा निर्णय! परीक्षेसाठी 15 मिनिटे अतिरिक्त वेळ.......
भारतात पेट्रोल-डिझेल दरात विक्रमी वाढ, मुंबई, पुणे, नागपूर, अमरावीतील
भारतात पेट्रोल-डिझेल दरात विक्रमी वाढ, मुंबई, पुणे, नागपूर, अमरावीतील.
देशवासियांना सकाळ सकाळीच महागाईचा धक्का; नवी दिल्लीत पेट्रोल-डिझेल....
देशवासियांना सकाळ सकाळीच महागाईचा धक्का; नवी दिल्लीत पेट्रोल-डिझेल.....