AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऊस तोडणीसाठी पैशाची मागणी, मग ‘हा’ आहे ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडे पर्याय

ऊस अडचणीतच आहे, तोडण्यायोग्य़ नाही अशी एक ना अनेक कारणे सांगत ऊस तोडणीसाठी शेतकऱ्याची अडवणूक केली जाते. साखर कारखान्याकडून पैसे घेऊनही अधिकच्या पैशाची मागणी ही शेतकऱ्याकडे केली जाते. यावर यंदा मात्र, अंकुश येणार आहे. कारण पैशाची मागणी केली तर थेट ग्रामपंचयात कार्यालयात संबंधिताला तक्रार करता येणार आहे.

ऊस तोडणीसाठी पैशाची मागणी, मग 'हा' आहे ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडे पर्याय
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Oct 12, 2021 | 11:35 AM
Share

लातूर : कारखान्याला ऊस घालण्याच्या दृष्टीने शेतकरी एक ना अनेक पर्यायांचा अवलंब करीत असतो. मात्र, शेतकऱ्यांच्या याच परस्थितीचा फायदा हा शेतमजूर किंवा कारखान्याकडून नियुक्त केलेले मुकादम हे घेतात. ऊस अडचणीतच आहे, तोडण्यायोग्य़ नाही अशी एक ना अनेक कारणे सांगत ऊस तोडणीसाठी शेतकऱ्याची अडवणूक केली जाते. साखर कारखान्याकडून पैसे घेऊनही अधिकच्या पैशाची मागणी ही शेतकऱ्याकडे केली जाते. यावर यंदा मात्र, अंकुश येणार आहे. कारण पैशाची मागणी केली तर थेट ग्रामपंचयात कार्यालयात संबंधिताला तक्रार करता येणार आहे.

साखर कारखाने सुरु झाले की, वेगवेगळ्या पध्दतीने जो-तो पैसे कमवण्याच्या यंत्रणेत गुंतलेला असतो. आता ऊस तोडणीची जबाबदारी ही साखर कारखान्यांची आहे. त्याअनुशंगाने मुकादम याला ऊस तोडणीचे पैसे देऊन कामगारांची सोय करण्यात आलेली असते. पण स्थानिक पातळीवर ऊस तोडणीस अडचणी आहेत, वाहन येऊ शकत नाही, ऊस हा तोडणीयोग्य नाही यासारखी कारणे सांगून पैशाची मागणी केले जाते. अशा प्रकारच्या तक्रारी थेट साखर आयुक्त कार्यालयापर्यंत गेलेल्या आहेत. त्यामुळेच आता साखर आयुक्त यांनी पैशाची मागणी केली तर तक्रार करण्याचे अवाहन केले आहेय त्यामुळे या गैरप्रकाराला आळा बसणार आहे.

ऊस गाळपाची चिंताच करु नका

गाळप हंगामात आपला ऊस कारखान्याला जातो की नाही, याची चिंता शेतकऱ्याला सतावत असते. आता पर्यंत दरवर्षी असेच झालेले आहे. यंदा ऊसाचे गाळप हे तब्बल 150 दिवस राहणार आहे. शिवाय केवळ साखर निर्मित एवढेच नाही तर यंदा इथेनॅालचीही निर्मिती करण्यात येणार आहेय त्यामुळे हंगाम संपेल आणि ऊस गाळप राहिल ही शंकाच ठेऊ नका असे अवाहन साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी केले आहे. त्यामुळे अधिकचे पैसे ना ऊसतोड मजूराल ना मुकादमाला देण्याचे अवाहन त्यांनी केले आहे.

हा आहे ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडे पर्याय

शेतकऱ्यांच्या तक्रारी निवारण्यासाठी एका कृषी अधिकाऱ्याची नेमणूक करण्याची सुचना साखर कारखान्यांना करण्यात आलेली आहे. त्या अधिकाऱ्याचा संपर्क क्रमांक हा ग्रामपंचायतीच्या फलकावर नमूद केला जाणार आहे. शेतकऱ्याने त्या अधिकाऱ्याकडे लेखी तक्रार करून ही तक्राक साखर आयुक्तालयाच्या shetkari.madat@gmail.com या मेलवर पाठवण्याचे अवाहनही करण्यात आले आहे. एवढेच नाही तर या तक्रारीमध्ये मजूर, मुकादम, वाहन क्रमांक ईत्यादी बाबींचा उल्लेख करण्याचे सांगण्यात आले आहे. यामध्ये पैशाच्या मागणीचे निष्पन्न झाले तर संबंधित मुकादमाच्या बिलातून ही रक्कम कापून घेतली जाणार आहे.

15 ऑक्टोंबर पासून कारखाने होणार सुरु

राज्यात 15 ऑक्टोंबर पासून ऊसाचे गाळप सुरु होणार आहे. त्या अनुशंगाने साखर कारखान्यावर लगबग ही सुरु झाली आहे. मात्र, अधिकचा ऊस कारखान्यावर घेण्याच्या दृष्टीने जाहीर केलेल्या तारखेच्या आगोदर कारखाने सुरु केले तर कारवाई केली जाणार आहे. शिवाय ऊस कोणत्या कारखान्याला घालायचा याचे स्वातंत्र हे शेतकऱ्यांना असणार आहे. (Action to be taken against sugar factories if money is demanded for sugarcane harvesting)

संबंधित बातम्या :

15000 शेतकरी एकवटले अन् इतिहास घडला..

24 लाख खर्चून पॉलिहाऊस उभारलं, लॉकडाऊनमुळे फुलांची विक्रीच नाही, शेतकऱ्याने फुलबागेवर नांगर फिरवला!

आहो खरंच..! कांद्याचीही चोरी, नैसर्गिक संकटावर मात केली पण….

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या