AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आहो खरंच..! कांद्याचीही चोरी, नैसर्गिक संकटावर मात केली पण….

एखाद्या वस्तूचे दर वाढले की काय होते याचा प्रत्यय धुळ्यातील कुसुंबा परिसरात आलेला आहे. विक्रीला आलेला 100 क्विंटल कांदाच चोरट्यांनी लंपास केला आहे. सध्या कांद्याला चांगला दर मिळत आहे. शिवाय दिवसागणिक दरात वाढ होत आहे. त्यामुळे साठवणूक केलेल्या कांद्याची थेट चोरीच झाल्याने परिसरातील शेतकरी हवालदिल झाले आहेत.

आहो खरंच..! कांद्याचीही चोरी, नैसर्गिक संकटावर मात केली पण....
कांदा
| Edited By: | Updated on: Oct 11, 2021 | 6:42 PM
Share

धुळे : नैसर्गिक संकटामुळे (Farmer) राज्यातील शेतकऱ्याचे कंबरडे मोडलेले आहे. हे कमी म्हणून की काय आता भलत्याच संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. (Onion) एखाद्या वस्तूचे दर वाढले की काय होते याचा प्रत्यय (Dhule) धुळ्यातील कुसुंबा परिसरात आलेला आहे. विक्रीला आलेला 100 क्विंटल कांदाच चोरट्यांनी लंपास केला आहे. सध्या कांद्याला चांगला दर मिळत आहे. शिवाय दिवसागणिक दरात वाढ होत आहे. त्यामुळे साठवणूक केलेल्या कांद्याची थेट चोरीच झाल्याने परिसरातील शेतकरी हवालदिल झाले आहेत.

निसर्गाच्या लहरीपणामुळे खरीपातील कांद्याचे भवितव्य अंधारात आहे. पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे कांद्यावर रोगराईचा प्रादुर्भाव झालेला आहे. कांद्याची वाढच खुंटल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे कांदाचाळीत साठवणूक केलेल्या कांद्याला सोन्याचा भाव मिळत आहे. शिवाय कांद्याची आवक कमी राहिली तर भविष्यात दर हे वाढणार आहेत. त्यामुळे धुळे जिल्ह्यातील कुसुंबा येथील शेतकरी सुभाष रामराव शिंदे यांनी कांदा चाळीत 150 क्विंटल कांद्याची साठवणूक केली होती.

कांद्याला चांगला दर मिळाला म्हणून त्यांनी 15 क्विंटल कांद्याची विक्री केली होती. शिवाय उर्वरीत 100 क्विंटल कांदा तसाच कांदाचाळीत साठवला होता. आवक अशीच कमी राहिली तर दर चांगला मिळेल अशी आशा सुभाशराव यांना होती. पण रात्री भलतेच काही घडले आणि कांदा चाळीतील 100 क्विंटल कांदाच चोरट्यांनी लंपास केला. त्यामुळे पावसासारख्या नैसर्गिक संकटावर सुभाषराव यांना कांदा चाळीमुळे मात करता आली पण चोरट्यांने त्यावर डल्ला मारलाच. त्यामुळे त्यांचे तब्बल 3 लाख 50 हजाराचे नुकसान झाले आहे.

यामुळे केली होती कांद्याची साठवणूक

कांद्याचे दर हे रात्रीतून कमी होतात अगदी त्याप्रमाणे ते वाढतातही. कांद्याचे दर साधायचे असतील तर अधिकतर शेतरकरी आता कांदाचाळीचा वापर करीत आहेत. त्याचप्रमाणे सुभाष शिंदे यांनी कांद्याची साठवणूक केली होती. शिवाय अपेक्षेप्रमाणे कांद्याचे दरही वाढत होते. प्रतिकिलो 40 चा दर मिळत होता म्हणून शिंदे यांनी गत आठवड्यात 15 क्विंटल कांद्याची विक्रीही केली होती. ज्यादा दर मिळल्यास उर्वरीत कांद्याची विक्री करण्याचा त्यांचा मानस होता पण विपरीतच घडले. चोरट्यांनी होत्याचे नव्हते केले.

3.5 लाख रुपयांचा चोरीला गेलेला कांदा

कांद्याचे दर वाढत आहेत. त्यामुळे साठवलेल्या कांद्यावरच चोरट्यांच्या नजरा आहेत. कुसुंबा भागातीलच शेतकरी प्रफुल्ल शिंदे हे सकाळी शेतात गेले असता साठलेले कांदे विस्कटलेल्या अवस्थेत होते. त्यांनी लागलीच याची माहिती सुभाष शिंदे यांना दिली होती. एकंदरीत कांद्याचे दर वाढत असल्याने चोरीच्या घटनाही वाढत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये घबराहट निर्माण होत आहे. आजच्या बाजारभावानुसार सुभाष शिंदे यांचा साडेतीन लाख रुपयांपर्यंत कांदा चोरीला गेला आहे. शेतकऱ्याने तातडीने धुळे तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली त्यानंतर पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

चांगला दर मिळाला पण फायदा नाही झाला

सुभाष शिंदे शेतकरी म्हणाले की, सर्वांच्या बियाण्यांचे नुकसान झाल्यामुळे या भागातील अनेक शेतकऱ्यांचे बियाणे खराब झाले आहे मी चार हजार रुपये किंमतीचे उच्च प्रतीचे बियाणे असलेले कांदे लावले होते. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून साठलेल्या कांद्याची स्थिती चांगली आहे. काही दिवसांपूर्वी भाव कमी असल्याने कांद्याची विक्रीच केली नव्हती. पण आता कांद्याच्या दरात चांगली वाढ झाल्याने सहा महिन्यापासून साठवलेला कांदा हा विक्रीसाठी काढला होता. पण चोरीला गेलेल्या कांद्याला साडेतीन लाख गमवावे लागले. (theft-stolen-due-to-increase-in-onion-prices-type-of-khabad-in-dhule-district)

संबंधित बातम्या :

वारे बहाद्दर ! 10 हजार सोयाबीनला भाव, तरच व्यापाऱ्यांना गावात ‘एंन्ट्री’

सागवान शेतीमध्ये मुबलक पैसा, गरज आहे ‘ती’ अभिनव उपक्रमाची

गाळप सुरु होण्याच्या तोंडावर थकीत ‘एफआरपी’ रक्कम अदा, साखर आयुक्तालयाचा ‘कडू’ टोला झाला ‘गोड’

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.