AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गाळप सुरु होण्याच्या तोंडावर थकीत ‘एफआरपी’ रक्कम अदा, साखर आयुक्तालयाचा ‘कडू’ टोला झाला ‘गोड’

आठवड्याभरात 23 साखर कारखान्यांनी तब्बल 125 कोटींची थकीत एफआऱपी रक्कम अदा केलेली आहे. त्यामुळे कारखान्यांचे गाळप सुरु करण्याबाबत आयुक्तालयाने घेतलेला निर्णय ऊस उत्पाकांसाठी गोड ठरला आहे.

गाळप सुरु होण्याच्या तोंडावर थकीत 'एफआरपी' रक्कम अदा, साखर आयुक्तालयाचा 'कडू' टोला झाला 'गोड'
साखर कारखाना
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Oct 11, 2021 | 4:06 PM
Share

मुंबई : थकीत रकमेचा परतावा केल्याशिवाय साखर कारखाने सुरु करण्याला परवानगी दिली जाणार नसल्याचा पवित्रा साखऱ आयुक्तालयाने (sugar commissioner) घेतला होता. या कठोर भुमिकेमुळे (Sugar Factory) साखर कारखान्यांचे चांगलेच धाबे दणानले असल्याचे चित्र राज्यात झाले आहे. कारण गाळप हंगाम सुरु होण्यास अवघे चार दिवस बाकी आहेत. अशा परस्थितीमध्ये आठवड्याभरात 23 साखर कारखान्यांनी तब्बल 125 कोटींची थकीत एफआऱपी रक्कम अदा केलेली आहे. त्यामुळे कारखान्यांचे गाळप सुरु करण्याबाबत आयुक्तालयाने घेतलेला निर्णय ऊस उत्पाकांसाठी गोड ठरला आहे. 23 साखर कारखान्यांनी घेतलेली भुमिका इतर साखर कारखान्यांनीही घेऊन अडचणीत असलेल्या ऊस उत्पादकांना मदत करावी आणि कारखाना सुरु करण्याचा आपला मार्गही मोकळा करावा अशी अपेक्षा आता शेतकरी व्यक्त करीत आहेत.

राज्यातील साखर कारखान्यांचे गाळप हे 15 ऑक्टोंबरपासून सुरु होणार आहेत. त्या अनुशंगाने गतमहिन्यात मंत्री समितीचे बैठक पार पडली होती. याच बैठकी दरम्यान एफआरपी क्लीअर केल्याशिवाय गाळप परवाना देणार नाही, अशी अट साखर आयुक्तालयाने घातली होती. याचा परिणाम आता कारखाने सुरु होण्याच्या तोंडावर दिसत आहेत. गेल्या आठवड्यात एफआरपी थकीत असणाऱ्या २३ कारखान्यांनी १२५ कोटी रुपयांची थकीत एफआरपी शेतकऱ्यांना दिली.

एफआरपी उशीरा, कारखानेही उशीरा

यंदाचा गाळप हंगाम सुरु होण्याकरिता केवळ चार दिवसाचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे साखर कारखान्यांवर संचालकांची लगबग ही सुरु झाली आहे. शिवाय अनेक साखर कारखान्यांनी ही एफआरपी ची थकीत रक्कम अदा करण्यावर भर दिला आहे. मात्र, असे असतनाही जर एफआरपी रक्कम देण्यास उशीर झाला तर साखर कारखानेही उशीरानेच सुरु करण्याचा सल्ला साखर आयुक्तालयाने कारखान्यांच्या संचालकास दिलेला आहे. त्यामुळे उर्वरीत साखर कारखान्यांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे उर्वरीत काळात इतर कारखाने थकीत एफआरपी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देतील अशी आशा आहे.

अशी आहे थकीत ‘एफआरपी’ ची अवस्था

सप्टेंबर अखेरपर्यंत 154 कारखान्यांनी पूर्ण एफआरपी उत्पादकांना दिली. 4 कारखान्यांनी 60 टक्क्यांपेक्षा कमी एफआरपी दिली आहे. 8 कारखान्यांनी 60 ते ८0 टक्के एफआरपी आणि 24 कारखान्यांनी 81 ते 99 टक्के एफआरपी दिली आहे. राज्यात 30 सप्टेंबरपर्यंत एफआरपीचे 31,243 कोटी रुपये दिले आहेत.

काय झाले होते बैठकीत

राज्यातील 146 साखर कारखान्यांनी एफएआरपीची 100 टक्के रक्कम शेतकऱ्यांना दिली आहे. ज्या कारखान्यांनी शेतकऱ्यांची एफआरपी रक्कम शेतकऱ्यांना पूर्णत्वाने दिली ते कारखाने सोडून इतर कारखान्यांना गाळप परवाने देऊ नयेत असाही निर्णय घेण्यात आला. बँकांकडून मालतारण कर्जाची मिळणारी रक्कम कारखान्याने थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावी असेही निर्देशही बैठकीत देण्यात आले. (sugarcane-farmers-get-frp-amount-of-rs-125-crore-dues-in-a-week)

संबंधित बातम्या :

रुपडे बदललेला सातबारा थेट शेतकऱ्यांच्या दारी, कसा काढायचा डिजीटल सातबारा ?

शेतकरीही वर्तवणार आता पावसाचा अंदाज, हवामान तज्ञांचा शेतकऱ्यांना सल्ला

नैसर्गिक आपत्तीमुळे जनावराचा मृत्यू ; नुकसानभरपाईसाठी असा करा अर्ज…

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या