AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘ई-पीक पाहणी’ आता ‘ई- गिरदावरी’, महाराष्ट्रातील यशानंतर राजस्थानात राबवला जाणार हा उपक्रम

अवघ्या पाच महिन्यांमध्ये 'ई-पीक पाहणी' हा उपक्रम राज्यात यशस्वी झाला होता. नुकसानभरपाईच्या दरम्यान, ई-पीक पाहणीच्या माध्यमातून पिकांची नोंदणी करणारे शेतकरी हे समोर आले होते. राज्यात हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता राजस्थान सरकार हाच उपक्रम 'ई-गिरदावरी' या नावाने राबवणार आहे.

'ई-पीक पाहणी' आता 'ई- गिरदावरी', महाराष्ट्रातील यशानंतर राजस्थानात राबवला जाणार हा उपक्रम
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Jan 10, 2022 | 7:15 AM
Share

मुंबई : (E-Pik- Pahani) ‘ई-पीक पाहणी’चा प्रयोग राबवणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य होते. गत खरीप हंगामापासून हा उपक्रम राबवण्यात येत आहे. सुरवातीला अनेकांनी या प्रणालीतील चुकांवर बोटही ठेवले. विरोधकांनीही तर हा उपक्रमच बंद करण्याची मागणी केली होती. मात्र, यामुळे कारभारात नियमितता आणि थेट (Farmer) शेतकऱ्यांच्या तक्रारीचे निरसण झाले होते. अवघ्या पाच महिन्यांमध्ये ‘ई-पीक पाहणी’ हा उपक्रम राज्यात यशस्वी झाला होता. (crop loss) नुकसानभरपाईच्या दरम्यान, ई-पीक पाहणीच्या माध्यमातून पिकांची नोंदणी करणारे शेतकरी हे समोर आले होते.

राज्यात हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता राजस्थान सरकार हाच उपक्रम ‘ई-गिरदावरी’ या नावाने राबवणार आहे. हा उपक्रम कृषी आणि महसूल विभागाला दिशादर्शक ठरत असल्याचे राजस्थानचे महसूल मंत्री रामलाल जाट यांनी म्हटल्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे.

‘ई-पीक पाहणी’मुळे आर्थिक नियोजन

‘ई-पीक पाहणी’चा मुळात हाच उद्देश होता की, कारभारात तत्परता यावी. यापूर्वी महसूल विभागाकडे मनुष्यबळाचा आभाव असल्याने कर्मचारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर न जाता पिक पेरा घेत होते. त्यामुळे भविष्यात अडचणी निर्माण होत होत्या. मात्र, या नविन उपक्रमामुळे शेतकरी हे काळजीने पिकपेऱ्याची नोंद करीत आहेत. त्यामुळे नुकसानभरपाईपासून कोणी वंचित राहत नाही. यामुळे पिकांची आकडेवारी, उत्पादकता, शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन याची सांगड घालण्यात सरकार यशस्वी ठरलेले आहे.

अगोदर पथकाकडून पाहणी मगच घेतला निर्णय

महाराष्ट्रात राबवण्यात आलेल्या ‘ई-पीक पाहणी’ या उपक्रमाचा अभ्यास करण्यासाठी राजस्थान सरकारने एक पथक राज्यात पाठवले होते. यामध्ये जिल्हाधिकारी, ‘एनआयसी’ तांत्रिक अधिकारी यांनी उपक्रमाची माहिती घेतली. एवढेच नाही तर पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधलेला आहे. या पथकाने डिजीटल सातबारा म्हणजेच ई- फेरफार प्रकल्पाचा आढावा घेतल्यानंतरच हा निर्णय घेतला आहे. मात्र, हा उपक्रम राजस्थानमध्ये ‘ई-गिरदावरी’ या नावाने ओळखला जाणार आहे.

‘ई-पीक पाहणी’ अॅपच्या माध्यमातून नोंदणी

यंदा प्रथमच राज्य सरकारने ई-पीक पाहणीचा प्रयोग खरीप हंगमात राबवण्याचे धोरण आखले होते. मात्र, यावरुन अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. पण अनंत अडचणींवर मात करुन हा अनोखा प्रयोग शेतकऱ्यांनी यशस्वी करुन दाखवला आहे. या ई-पीक पाहणीचा अहवाल हा समोर आला असून राज्यातील तब्बल 58 लाख 39 हजार शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची नोंद या माध्यमातून करुन शासन दरबारी पाठवली होती. त्यामुळे हा प्रयोग यशस्वी झाल्याचे महसूल विभागाच्यावतीने सांगण्यात आले होते. या यशानंतरच आता राजस्थान सरकार हा प्रयोग राबवणार आहे.

संबंधित बातम्या :

शिंदखेडची भेंडी भाव खातेय लंडनच्या बाजारपेठेत, शेतकऱ्यांच्या एकजूटीचा निर्णय अन् फळही

Untimely Rain : उरली-सुरली आशा अवकाळीने मावळली, वादळी वाऱ्याने फळबागासह पीके आडवी झाली

साखर कारखान्यांच्या माध्यमातूनच ऊसतोड कामगारांचे हीत, समाजकल्याण विभागाचा काय आहे निर्णय?

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या